महाराष्ट्रसामाजिक

चाफळ विभागात लम्पीच्या शिरकावाने शेतकरी भयभीत

लोकसत्य न्यूज

        चाफळ/उमेश सुतार : चाफळ विभागातील चाहूरवाडीत येथे एक आठवडयापासून दोन बैलांमध्ये ‘लम्पी रोगाची लक्षणे दिसून आली असून चाफळ विभागात लम्पीच्या शिरकावाने शेतकरी भयभीत झाला आहे.
संबंधित  शेतकऱ्यांनी सद्यस्थितीत खासगी डॉक्टरांकडून लम्पीग्रस्त बैलांवर उपचार सुरू केले आहेत. चाफळ विभाग हा दुर्गम व डोंगराळ असा आहे. या भागातील बहुतांश लोकांचा शेती व्यवसाय आहे. त्यामुळे पाळीव जनावरांची संख्या मोठी आहे पशुपालनावरच अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र गत आठवड्यापासून चाफळ विभागातील चाहूरवाडी  येथील शेतकरी मारुती आबा पवार व अमोल आनंदा कोसमकर यांच्या मालकीच्या असलेल्या दोन बैलांमध्ये लम्पीची लक्षणे आढळून आली आहेत. पेरणीच्या तोंडावरच या रोगाने तोंड वर काढल्याने शेतकरी वर्गातून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या दोन बैलापैकी एकाला दहा दिवसापासून लक्षणे दिसून आली आहेत तर दुसऱ्या  बैलामध्ये ७ दिवसापासून लक्षणे दिसू येत असल्याचे संबंधित  शेतकन्यांनी सांगितले. एकीकडे पावसाअभावी पेरण्या न झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे तर दुसरीकडे लम्पीने डोके वर काढल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.

      चाहूरवाडी शिवारात सहा गावाची जनावरे…

      पावसाने काही प्रमाणात उघडीप दिल्याने चाहूरवाडी शिवारात  शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त झाला आहे. मात्र चाहूरवाडी शिवारात चव्हाणवाडी, नानेगाव, चाहूरवाडी कवठेकरवाडी सुर्याचीवाडी येथील  जनावरे येतात. सद्यस्थितीत चाहूरवाडीत लम्पीच्या रोगाने ठाण मांडले असल्याने याचा संसर्ग इतर जनावरांना होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. यासाठी पशुसंवर्धन विभागाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सहा गावच्या ग्रामस्थांनी केली आहे.
Share

Chief Editor - Raphik Shaikh

"लोकसत्य न्यूज" हे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही या माध्यमातून आपल्याकडे पोहोचत आहोत. प्रत्येक बातमीशी मुख्य संपादक सहमत असतीलच असे नाही तर संबंधीत बातमीला जे ते प्रतिनिधी जबाबदार असतील. आपण आपल्या बातम्या WhatsApp, Email द्वारा आम्हाला पोहचवू शकता. raphik.261175@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!