ग्रामीणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चाफळ विभागात अतिवृष्टीमुळे घरांची पडझड

Loksatya News

       चाफळ/उमेश सुतार : येथील विभागात अतिवृष्टीमुळे घरांची पडझड चापळसह विभागात गेले दहा दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने हाहाकार माजवला आहे.

      विभागातील सात गावातील 11 घरांच्या भिंतीची पडझड होण्याच्या घटना घडल्या आहेत. विभागातील बोर्गेवाडी, कोळेकरवाडी, डेरवण, खोनोली, मसुगडेवाडी, बहिरेवाडी, जाळगेवाडी या ठिकाणी घरांच्या भिंतीची पडझड झाली आहे. या पडझडीची पाहणी पालकमंत्री शंभूराजे यांचे सूचनेनुसार संजय गांधी निराधार अध्यक्ष भरत साळुंखे, कारखान्याचे संचालक प्रशांत पाटील, चंद्रकांत पाटील, शिवाजी बोंगाणे, मनोहर कडव, योगेश जाधव, संभाजी डांगे यांनी केली.
अतिवृष्टीत नामदेव बोर्गे (बोरगेवाडी), बाळासो बबन कोळेकर, आनंदा दादू कोळेकर, सीताबाई गंगाराम कोळेकर, शंकर मधुकर कोळेकर सर्व राहणार कोळेकरवाडी, शालन शहाजी सोनवणे, डेरवण, जनार्दन जगन्नाथ तोडकर, खोनोली, सुरेश हरिभाऊ पवार व नारायण खाशावा पवार, मसुगडेवाडी/दाढोली, गणेश रामचंद्र कोळेकर बहिरेवाडी यांच्या घराच्या भिंतीची पडझड झाली आहे, तर बाळकृष्ण दिनकर काटे जाळगेवाडी यांच्या घराचा पत्रा उडून गेला आहे.

Share

Chief Editor - Raphik Shaikh

"लोकसत्य न्यूज" हे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही या माध्यमातून आपल्याकडे पोहोचत आहोत. प्रत्येक बातमीशी मुख्य संपादक सहमत असतीलच असे नाही तर संबंधीत बातमीला जे ते प्रतिनिधी जबाबदार असतील. आपण आपल्या बातम्या WhatsApp, Email द्वारा आम्हाला पोहचवू शकता. raphik.261175@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!